‘स्टार प्रवाह’वरील ‘विठुमाऊली’ या मालिकेतून विठ्ठल आणि भक्तीचा अनोखा सोहळा प्रेक्षकांना अनुभवायला मिळतोय. विठुमाऊलीच्या भक्तीत तल्लीन असणाऱ्या भक्तांमध्ये कलीने दुफळी माजवायला सुरुवात केली. भक्त आणि भगवंत यांच्या अंताची सुरुवात होणार की काय अशी परिस्थीती निर्माण झालीय. या कठीण प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी पुंडलिकाने विठ्ठलाचं मंदिर बांधण्याचं ठरवलंय.
